‘जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’, रामदास आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी
Google News | Join WhatsApp | Join Telegram | Live |
Panchayat Swaraj Samachar News Desk.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चंद्रपूरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी शेरोशायरीतून फटकेबाजी केली. “आपण सर्वजण मोठ्या संख्येने चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, त्याचबरोबर गडचिरोली-चिमूरचे भाजपचे उमेदवार, ज्यांना नेते म्हणण्याची गरज नाही त्यांच्या नावातच नेते आहेत ते अशोक नेते, या दोन्ही नेत्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंधे ते एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे धाडसी माणूस, चाळीस प्लस 10 आमदारांना घेऊन… आता या ठिकाणी सुधीरभाऊ आलेले आहेत. आपण सर्वांनी जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारतचं गीत गाऊ, कारण या ठिकाणी आलेले आहेत सुधीर भाऊ. आपल्या सर्वांचे लाडके नेते इथे आलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंक सक्रिय राजकारणी आहेत. अत्यंत शक्तीशाली राजकारणी आहेत. या महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मजबूत करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील महायुती मजबूत करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा, कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा“, अशी फटकेबाजी रामदास आठवलेंनी केली.
तिकडे राहून काही उपयोग नव्हता. मी पूर्वी तिकडे होतो पण तिकडे राहून काही उपयोग नव्हता. नरेंद्र मोदींचं नेतृत्व विकासाच्या दिशेने पुढे जाणारं आहे. ज्यावेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान, साऱ्या जगाचं असतं भारताकडे ध्यान. या देशाची 140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन“, अशी शेरोशायरी रामदास आठवलेंनी केली.
Google News | Join Facebook | Live | 24/7 Help Desk |